
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

महाराष्ट्रातील महायुती सरकारने काही काळापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. याअंतर्गत आतापर्यंत सहा आठवड्यांचे वाटप करण्यात आले होते मात्र त्यानंतरचा आठवडा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. या संदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी तसेच घरगुती गरजा पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारने या योजनेअंतर्गत निधीची विशेष तरतूद केली आहे. राज्य शासनाद्वारे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरीत करण्यात येते ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, “शेतकऱ्यांच्या हितार्थ सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना अविरत चालू राहणार आहे व त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे व शेतकऱ्यांना याचा लाभ वेळोवेळी मिळत राहावा यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे आर्थिक स्थैर्य शेतकऱ्यांना कायम राखण्याची हमी अधिकाऱ्यांनी ठामपणे सुनिश्चित करावी.”

या बैठकीत एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या काळातील युतीसाठी एकूण एक हजार आठशे ब्यान्नव पूर्णांक एकसष्ठ (१,८९२.६१ कोटी रुपये) वितरण करण्याचा निर्णय झाला, ज्यामुळे एक्याण्णव लाख पासष्ठ हजार एकशे छप्पन्न (९१,६५,१५६) लाभार्थ्यांना थेट निधीचा लाभ मिळणार आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचे धैर्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.