सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात कपाशीच्या रानात फेरफटका मारला की काळजात चर्रर्र होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हवेतील अति दमटपणा यामुळे कपाशीच्या झाडाखाली गळून पडलेल्या हिरव्यागार पात्यांचा अक्षरशः सडा पडलेला दिसतो. शेतात झाडे उंच वाढलेली दिसतात, मात्र पात्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होण्याची थेट भीती निर्माण...